कंठ दाटुन आला मनी भावनांनचा कल्लोळ झाला नाही कुणि जवळ निजले सारे घर जाता तोल देहाचा धडपडले , जख्मि झाले मनालाही मग थोडे लागले सावरले मीच मजला हुंदका मग थांबऊ न शकले आसवांना वाट मोकळी भावनांनाचा निचरा अंधारल्या रात्रीच्या कुशित शिरून खुप खुप रडले थोपवाया कोण होते ? न अश्रू पुसाया पण जेव्हा मोकळे झाले मन स्वत:च स्वत: ला सावरले अग वेडे तुच तर आई , घराची मग आधार कुणाचा शोधते सावरण्याचे बळ सर्वानां ऐकट्या तुलाच लाभले ऊठ तु आत्ता , करू नको दु:ख मनाच्या शक्ति सवे भरले तुझे अस्तित्व मग लख्ख दिसणारया माझ्या अनेक भुमिकांचा आरसा जणू दिसला सावरलेल्या मना साठी झाले मग मोकळे आकाश